Marathi Jokes On Galli Cricket

Marathi Jokes On Galli Cricket And School Days

==गल्लीतल्या क्रिकेटचे नियम==

1.एक टप्पा आऊट.

2.जिंकेल तो पहिला.

3.कट ला एक.

4. टॉससाठी उन्हाळा का पावसाळा.

5 .बॉल घरात गेला की आऊट.

6. भिंतीला फूलटॉस लागला की आऊट.

7.जो कोण लांबचा शॉट मारेल त्यानेच बॉल

आणायचा.

8.पहिल्या बॉलवर आउट झाला की

म्हणणार....

अरे यार ट्रायल बॉल होता राव.

9.गटारी मध्ये बॉल गेल्यावर बॅट्समननेच

काढायचा...

काय छान दिवस होते राव ते.....

आठवत असतील हे नियम तर जरूर शेअर करा!

शाळा आमची छान होती,


Last bench वर आमची Team होती ….


जन-गण-मन ला शाळे बाहेर सुद्धा उभे

रहायचो …


प्रतिज्ञेच्या वेळी हाताला टेकू

देऊनही ….

प्रतिज्ञा म्हणायचो …

प्रार्थनेच्या वेळी मात्र….

सगळ्यांसारखे…नुसतेच

ओठ हालवायचो ….

पावसाळ्यात शाळेत

जाताना,
छत्री दप्तरात ठेऊन?


मुद्दामच भिजत जायचं,

पुस्तक भिजू नये

म्हणून ….त्याना पिशव्यांमध्ये ठेवायचं ….

शाळेतून येता येता …

एखाद्या डबक्यात उडी मारून…उगीचचसगळ्

यांच्या अंगावर पाणी उडवायचं

प्रत्येक Off -Period ला P.T.

साठी….आमचा आरडाओरडा असायचा …
शाळेतून
घरी येताना शाळेबाहेरचा….तो बर्फाचा
गोळा संपवायचा ….
>इतिहासात होता शाहिस्तेखान
>नागरिक शास्त्रात पंतप्रधान
>गणित… भुमितीत होतं …

पायथागोरसच प्रमेय…
>भूगोलात वाहायचे वारे….नैऋत्य…मॉ न्सून
का कुठलेतरी … वायव्य….
>हिंदीतली आठवते ती “चिटी कि आत्मकथा”
>English मधल्या Grammar नेच
झाली होती आमची व्यथा …
शाळा म्हटली कि अजूनह आठवतात…. Desk वर
Pen ने
त्या “Pen-fights”

खेळणं ….
Exams मधल्या रिकाम्या जागा भरणं…
आणि जोड्या जुळवणं …
पण आता शाळा नाही, मित्र नाही,
परीक्षा नाही,
परिक्षेच Tension नाही, एकत्र राहण नाही
रुसवे फुगवे नाही.....I
आत्ता उरलीय फक्त
"दुनियादारी".।।।।